जीएसटी...‘अच्छे दिन’च्या युगाचा प्रारंभ!
‘जीएसटी’ अर्थात वस्तू व सेवाकर कायदा उद्यापासून (1 जुलै) संपूर्ण देशभरात लागू होत आहे. गेली कित्येक वर्षे रखडलेला हा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे यशस्वीरित्या अमलात येत आहे. वस्तू व सेवाकर हा अप्रत्यक्ष कर समजला जाईल. संपूर्ण देशात एकच करप्रणाली असावी, या हेतूने आणलेला जीएसटी हा अर्थव्यवस्थेतील एका नव्या पर्वाचा प्रारंभ आहे. त्यातील तरतुदी समजून घेतल्यास जीएसटी हा व्यापारी व ग्राहक दोन्ही वर्गासाठी फायदेशीर असल्याचे दिसून येईल.
वस्तू व सेवाकर हा ज्या व्यापारी कंपन्यांची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांनाच लागू होणार आहे. त्यामुळे वीस लाखांपुढे उलाढाल असलेल्यांनीच नोंदणी करणे आवश्यक आहे. छोट्या व्यापार्यांना जे जीएसटीमध्ये नोंदणी करतील, त्यांना सवलत देण्यासाठी स्वतंत्र योजना लागू करण्यात आली आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल 75 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनी त्रिमासिक विवरण भरावे व फक्त विक्री दाखवावी, त्यांना त्याचा सेट ऑफ मिळणार नाही. ही सुविधा व्यापारी (1 टक्का), उत्पादक (2 टक्के), सेवादाते (5 टक्के), हॉटेलचालक यांना घेता येईल.
जीएसटी ही प्रणाली व्यापार्यांना शिस्त लावणारी प्रणाली आहे. सर्वसामान्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. जीएसटी आल्यानंतर 6-8 महिन्यांनी जेव्हा सर्व प्रणाली सुरळीतपणे चालेल तेव्हा सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा होईल. पहिले काही महिने काही वस्तू व सेवा महाग होताना दिसतील. उदा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, लहान कार, बँकिंग सेवा, सोने इत्यादी तर काही वस्तू स्वस्त होतील.
जीएसटीला घाबरून न जाता संयमाने आणि उत्साहाने त्याचे स्वागत केले पाहिजे. वस्तू व सेवा कर हा वस्तू व सेवा पुरवठ्यावर लागतो. हा कर 0 टक्के, 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के व 28 टक्के अशा विविध वस्तू व सेवांवर लागू होणार आहे. सर्वसामान्यांना लागणार्या अत्यावश्यक वस्तूंवर कमी कर आणि श्रीमंतांकडून खरेदी करण्यात येणार्या चैनीच्या वस्तू महाग होतील. तब्बल 81 टक्के वस्तूंवर 18 टक्के जीएसटी लागतो.

जीएसटीमुळे स्पर्धा वाढून किंमती कमी होतील. त्यामुळे सर्वसामान्यांना येत्या काळात फायदा झाल्याचे चित्र दिसून येईल. संपूर्ण देश ही एक बाजारपेठ होऊन ती खुली होईल आणि कर प्रणाली सोपी झाल्यामुळे छोट्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठीही पुढे येतील. त्याचबरोबर व्यापार्यांनाही अधिक ग्राहक मिळतील. उत्पादन वाढेल. थोडक्यात अर्थव्यवस्थेला चालना मिळून खर्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येण्यास मदत होईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
जीएसटी...‘अच्छे दिन’च्या युगाचा प्रारंभ!
Reviewed by Unknown
on
11:21 AM
Rating:

No comments: