...तर शेतकर्‍यांना मिळणार 1 कोटीचे अनुदान


...तर शेतकर्‍यांना मिळणार 1 कोटीचे अनुदान


नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज ः तोट्यात असलेली शेती फायद्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून गट किंवा समूह शेतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी वीस शेतकर्‍यांनी एकत्र येऊन शंभर एकर  क्षेत्रामध्ये समूह शेती केल्यास त्यांना तब्बल एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 2017-18 आणि 2018-19 या दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नक्षलग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये ही योजना प्राधान्याने राबविण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस शेतीची धारण क्षमता कमी झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढून शेती हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणेही शेतकर्‍यांना परवडत नाही. त्यामुळे गटशेती किंवा समूहशेतीला प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये शेतकर्‍यांना पीक उत्पादन वाढीसाठी खते, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषी प्रक्रीया, पणन, शेततळे आदी बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे. पाच टप्प्यांमध्ये हे अनुदान देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रकल्प मंजुरीनंतर 20 टक्के, दुसर्‍या टप्प्यात 30 टक्के, तिसर्‍या टप्प्यात 30 टक्के तर अंतिम टप्प्यात संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून उर्वरित 20 टक्के रक्कम देण
...तर शेतकर्‍यांना मिळणार 1 कोटीचे अनुदान ...तर शेतकर्‍यांना मिळणार 1 कोटीचे अनुदान Reviewed by Unknown on 8:42 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads