‘पीक विमा योजने’कडे शेतकर्यांनी फिरविली पाठ
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज ः केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पंतप्रधान कृषी विमा योजने’कडे जिल्ह्यातील शेतकर्यांनी पाठ फिरविली आहे. 77 हजार शेतकर्यांनी खरीप पीकाचा विमा उतरावा, असे जिल्हा प्रशासनाचे लक्ष असताना अवघ्या 2 हजार 800 शेतकर्यांनीच पीक विम्याचा हप्ता भरला आहे. विशेष म्हणजे विम्याचा हप्ता भरण्यासाठी अवघे पाच दिवस (31 जुलै पर्यंत) उरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्यांनी पीक विम्याचा हप्ता भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे. शेतकर्यांना नगदी पिकासाठी 5 टक्के तर खरीप पिकासाठी 2 टक्के प्रिमियम भरावा लागणार आहे. प्रिमियमची रक्कम भरल्यानंतर भात पिकासाठी हेक्टरी 39 हजार रुपये, बाजरी 20 हजार रुपये, तूर 30 हजार रुपये, भुईमूग 30 हजार रुपये, सोयाबीन 40 हजार रुपये, कांदा 55 हजार रुपये तर मूग, नाचणी आणि उडीद पिकासाठी हेक्टरी 20 हजार रुपये रकमेचे संरक्षण मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील 77 हजार शेतकर्यांनी विम्याची रक्कम भरण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज ः केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पंतप्रधान कृषी विमा योजने’कडे जिल्ह्यातील शेतकर्यांनी पाठ फिरविली आहे. 77 हजार शेतकर्यांनी खरीप पीकाचा विमा उतरावा, असे जिल्हा प्रशासनाचे लक्ष असताना अवघ्या 2 हजार 800 शेतकर्यांनीच पीक विम्याचा हप्ता भरला आहे. विशेष म्हणजे विम्याचा हप्ता भरण्यासाठी अवघे पाच दिवस (31 जुलै पर्यंत) उरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्यांनी पीक विम्याचा हप्ता भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे. शेतकर्यांना नगदी पिकासाठी 5 टक्के तर खरीप पिकासाठी 2 टक्के प्रिमियम भरावा लागणार आहे. प्रिमियमची रक्कम भरल्यानंतर भात पिकासाठी हेक्टरी 39 हजार रुपये, बाजरी 20 हजार रुपये, तूर 30 हजार रुपये, भुईमूग 30 हजार रुपये, सोयाबीन 40 हजार रुपये, कांदा 55 हजार रुपये तर मूग, नाचणी आणि उडीद पिकासाठी हेक्टरी 20 हजार रुपये रकमेचे संरक्षण मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील 77 हजार शेतकर्यांनी विम्याची रक्कम भरण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
‘पीक विमा योजने’कडे शेतकर्यांनी फिरविली पाठ
Reviewed by Unknown
on
8:25 AM
Rating:

No comments: