हातावरील मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नवविवाहितेचा पतीने केला खून


हातावरील मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच 

नवविवाहितेचा पतीने केला खून 

कात्रज-संतोषनगर भागातील घटना 




नमस्कार पुणे ऑनलाइन : लग्नानंतर हातावरील मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना कात्रज-संतोषनगर भागात बुधवारी रात्री 11 वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
ऋतुजा (वय 18) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तिचा पती दीपक शिवाजी जाधव (रा. शारदा भवन जवळ, संतोषनगर, कात्रज) यास अटक करण्यात आली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे यांनी माहिती दिली. दीपक आणि ऋतुजा यांचे दोन महिन्यापूर्वी ठरवून लग्न झाले होते. ऋतुजा हिचे माहेर पाटील एस्टेट भागात आहेे. तर दीपक हा मुंबईचा आहे. लग्नानंतर ते संतोषनगर येथे भाड्याने रहात होते. दीपक हा रिक्षा चालवत होता. ऋतुजा हिचे लग्नापूर्वीपासून अन्य एका युवकाशी प्रेमसंबंध होते. याच कारणावरुन लग्न ठरले त्यावेळी संबंधित युवक आणि दीपक यांच्यात वादही झाला होता. परंतु घरच्या मंडळींच्या दबावामुळे त्यांचे लग्न झाले. अखेर बुधवारी रात्री दोघा पती-पत्नीमधे वाद झाला. यावेळी रागातून दीपक याने ऋतुजा हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो घरातून पसार झाला, परंतु भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना हडपसर भागातून ताब्यात घेतले. ही करवाई पीआय वाघचवरे यांच्या मार्गदर्शनखाली पीएसआय दत्ताजीराव मोहिते, अमोल पवार, सर्फराज देशमुख, प्रणव संकपाळ, गणेश चिंचकर, महेश मंडलिक, अभिजीत रत्नपारखी, कुंदन शिंदे, चंद्रकांत फडतरे यांनी केली.
हातावरील मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नवविवाहितेचा पतीने केला खून हातावरील मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नवविवाहितेचा पतीने केला खून Reviewed by Unknown on 3:17 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads